जनतेज न्युज

नियमानुसार बिहारचे आयपीएस पोलीस अधिकारी क्वारंटाइन, मुंबई महापालिकेचे स्पष्टीकरण

प्रतिनिधी , मुंबई : अभिनेता सुशातसिंह राजपूत आत्महत्या (Sushat Singh Rajput suicide) प्रकरणाच्या चौकशीसाठी पाटण्याहून मुंबईत आलेले बिहारचे आयपीएस अधिकारी विनय तिवारी (Vinay Tiwari) यांना मुंबई पालिकेने सक्तीने क्वारंटाइन केल्याची टीका होऊ लागली आहे. मात्र देशांतर्गत विमान प्रवास करणाऱ्या व्यक्तीसाठी राज्य सरकारच्या नियमावलीनुसार होम क्वारंटाइन आवश्यक आहे. या अलगीकरणातून सूट मिळण्यासाठी अर्ज करण्याबाबत तिवारी यांना कळविण्यात आल्याचे स्पष्टीकरण महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त पी. वेलासरु यांनी बिहारच्या पोलीस महासंचालकांना दिले आहे.

बिहारमधील कोरोना विषाणूची साथीची स्थिती लक्षात घेता, महाराष्ट्र शासनाच्या विविध संबंधित अधिकाऱ्यांसह झूम / गूगल मीट / यूओ मेओट सारख्या डिजिटल प्लॅटफॉर्मवर कार्यवाही करण्याचा सल्ला देण्यात येतो. मायक्रोसॉफ्ट टीम किंवा इतर अशा डिजिटल प्लॅटफॉर्मवर परस्पर संवाद साधता येतो. कोरोनाचा वाढता संसर्ग लक्षात घेता अधिका्याने प्रचलित असलेल्या सर्व नियम व नियमांचे पालन केले पाहिजे असेही पत्रात नमूद केले गेले आहे.