जनतेज न्युज

पाथर्डी तालुका काँग्रेसच्या वतीने केंद्र सरकार चे निषेध करून मशाल मोर्चा काढण्यात आला

प्रतिनिधी , संजय लहासे : पाथर्डी : काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष नामदार बाळासाहेब थोरात, यांच्या मार्गदर्शनानुसार, युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष माननीय सत्यजित दादा तांबे पाटील,युवक जिल्हा समन्वय राजेंद्र बोरुडे यांच्या सूचनेनुसार या विधेयकाच्या विरोधात हा मोर्चा आयोजित करण्यात आला होता. 
हरित क्रांतीचे प्रणेते माजी मुख्यमंत्री स्व. वसंतराव नाईक यांच्या पुतळ्यापासून ते डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापर्यंत हा मशाल मोर्चाचे आयोजन केले होते.यावेळी केंद्र सरकारच्या विरोधात घोषणा देऊन केंद्र सरकारचा निषेध करण्यात आला. 
शेतकऱ्यांच्या विरोधात बहुमताच्या जोरावर जे कृषिविषयक विधेयक संमत केले आहे.विधेयकाचे तरतुदी या अत्यंत जाचक आहेत शेतकरी बांधवांवर अन्याय करणारे आहेत. यामुळे भारतातील शेतकरी वर्ग विस्थापित होण्याचा धोका वाढला आहे. सदर करार पद्धत अस्तित्वात आल्यास गरीब शेतकरी वर्ग यामध्ये भरडला जाण्याची शक्यता आहे. या विधेयकाच्या अनेक तरतुदी या शेतकरी बांधवांवर अन्याय करणाऱ्या असून केंद्र सरकारने या  हे विधेयक त्वरित रद्द करावे अन्यथा रस्त्यावर उतरू आंदोलन करू असे यावेळी कॉग्रेस तालुकाध्यक्ष नासिर शेख म्हणाले .
याप्रसंगी पाथर्डी तालुका काँग्रेस कमिटीचे जालिंदर काटे नवाबभाई शेख, किशोर डांगे, रवींद्र पालवे, जुनेद पठाण, दिलीप पानखडे, बोबडे,जब्बार आतार, सरफराज चौधरी, युसूफ खान, स्वप्निल सुरवसे,असिफ जहागीरदार,सिकंदर शेख,मोसिन शहा,जावेद पिंजारी, मोहम्मद शेख आदी कार्यकर्ते उपस्थित होते.