प्रतिनिधी, अकोला : भविष्यात बाळासाहेब उर्फ़ प्रकाश आंबेडकर आणि उद्धव ठाकरे साहेब एकत्र असणार तर आनंदाची गोष्ट आहे. आज भारताला संविधान हे डॉक्टर बाबासाहेबांची मोठी देणगी आहे, या सविधानावर हल्ला होतोय, खरचं लोकशाही आहे का असा प्रश्न निर्माण होतो. असे अनेक प्रश्न निर्माण होत आहेत, म्हणून आता ज्यांना ज्यांना वाटतं भारताचे संविधान सुरक्षित व्हावं, देशाची जातीय अवस्था निर्मूलन होवून न्याय व्यवस्था उभी राहावी.. सामाजिक न्यायाची असो, आर्थिक न्यायाची असो, शैक्षणिक न्यायाची असो. यासाठी सर्वांनी एकत्र आलं पाहिजे. असा आवाहन शिवसेनेचे नेते खासदार अरविंद सावंत यांनी केले आहे, ते अकोल्यात बोलत होते.
