प्रतिनिधी, अमरावती : राज्यघटनेवर चालणाऱ्या देशात हनुमान चालीसा पठण करून राजकारण करणाऱ्या राणा दाम्पत्याने अमरावती जिल्ह्याचा कोणताही विकास केला नाही असा आरोप भीम आर्मीने केला आहे,राणा दाम्पत्याला विकास कामाचा विसर पडला आहे,त्यामुळे राणा दाम्पत्याला विकास कामासाठी जाग यावी म्हणून अमरावती येथील राणा दाम्पत्याच्या घरासमोर भीम आर्मीचे वतीने संविधान उद्देशिकेचे वाचन करून आंदोलन करण्याचा इशारा भीम आर्मीने दिला होता. भीम आर्मीचे कार्यकर्ते राणा दाम्पत्याच्या घरासमोर संविधान प्रास्ताविका वाचण्याकरिता आले असता अर्धा किलोमीटर दूरवरच पोलिसांनी भीम आर्मीच्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले तत्पूर्वी भीम आर्मीच्या कार्यकर्त्यांनी अर्धा किलोमीटर दूरच सविधान प्रास्ताविकेचे वाचन केले.
