प्रतिनिधी , मुंबई : देशातील काही राज्ये सोडली तर महाराष्ट्रातील कोरोनाचा विळखा दिवसेंदिवस घट्ट होत आहे. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ३ मेपर्यंत लॉकडाऊनची घोषणा केली. राज्यात कोरोनाग्रस्तांची संख्या मुंबईत सर्वांत जास्त आहे. यातही जी साउथ वॉर्डमध्ये कोरोना व्हायरसने थैमान घातले आहे.
गोवा ठरले करोनाला हरवणारे देशातील एकमेव राज्य !
आतापर्यंत या भागात ३९० कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची नोंद करण्यात आली तर १७ कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे . जी साउथ वॉर्ड अंतर्गत लोअर परेल, वरळी आणि प्रभादेवी हे परिसर येतात . या भागात कोळीवाडा, जनता कॉलनी आणि जिजामातानगर येथे राहणाऱ्या कोरोनाबाधितांची संख्याही जास्त आहे.
