जनतेज न्युज

तालुक्यातील आंजी नजीकच्या पवनूर गावाला पुराचा तडाखा ; बंधारा फुटल्याने गावच जलमय

प्रतिनिधी, वर्धा : वर्धा तालुक्यातील आंजी नजीकच्या पवनूर गावाला पुराचा चांगलाच तडाखा बसला आहे. गावाच्या शेजारी असलेला वन विभागाचा बंधारा फुटल्याने अख्खे गावच पाण्यात बुडाले आहे. घरात तसेच गोठ्यात पाणी शिरल्याने पोलीस, महसूल आणि वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी रेस्क्यू ऑपरेशन सुरू केले आहे. आतापर्यंत 30 कुटुंब स्थलांतरित करण्यात आली असल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे.पवनुर गावाला पुराचा विळखा आहे.

 गावात बंधाचे  पाणी शिरल्याने समस्या वाढली आहे. गावात गुडघाभर पाणी असल्याने घरात थांबायचे कसे असच प्रश्न आहे. गावात पाणी शिरल्याने 30 कुटुंब उघड्यावर पडले. त्यांना स्थलांतर केले जात आहे. पवणूर नजीक असलेल्या आंजी, पुलई या ठिकाणी नागरिकांना हलविण्यात येत आहे.वनविभागाचा बांध फुटल्याने गावात पाणी शिरले आहे. हा बांध मातीचा असल्याने तो फुटला आहे. आतापर्यंत पुराच्या पाण्यात कोणतेही जीवितहानी झाली नाही  पवनूर गावातील नागरिकांची प्रशासनाकडून गावातील मंदिरात देखील व्यवस्था केली आहे.