प्रतिनिधी, जळगाव : पावसाळा सुरु झालं कि घरात बसून बेसनाचे भज्जे , गरम चाय , कॉफी व त्यात भुट्टे हे सर्वांना खाण्यासाठी जास्त आवडतात मात्र यावर्षी जळगावच्या बाजारातून भुट्टा गायब असल्याचे दिसून आले.
सुभाष चौक बाजार व महाराणा प्रताप पुतळ्याजवळ लागणाऱ्या बाजारात जाऊन नागरिक फळ, भाज्या खरेदी करतात मात्र यावर्षी जळगाव शहरात भुट्टा घेण्यासाठी फिरत असताना फक्त एकच भुट्टा विकणारा दिसून आला. त्यात ही तो महाग विकत असल्याने खरेदी करणाऱ्यांनी काढता पाय घेतला. भुट्टा ४० रुपये किलो तर २ किलो घेतल्यास ७० रुपये प्रमाणे विकला जात आहे. मक्याची खरेदी रावेर व बऱ्हाणपूर येथून खरेदी केली जात आहे.
