प्रतिनिधी , मुंबई : स्वत: सत्तेवर असताना राज्याला लुटायच आणि सत्ते वरुन पायउतार झाल्यानतंर राज्याला पेटवायच हेच धंदे राष्ट्रवादी पार्टीने क्रित्येक वर्ष केले आहेत. त्यामुळे गुडांची टोळी कोण आहे हे जनतेला माहिती आहे.
गेले सहा महिने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र राज्य सरकार ज्या पध्दताने प्रगती करते आहे ते बघून विरोधकांच्या पाया खालची वाळू सरकायला लागली आहे. त्यामुळेच विरोधकांची जीब सुध्दा घसरायला लागली आहे त्यामुळे विद्या चव्हाण यांनी अविद्या करू नये. असा टोला शिंदे गटाच्या शितल म्हात्रे यांनी लगावला आहे.
