जनतेज न्युज

भाजपचा विजय झाल्यास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राजीनामा द्यावा – रामदास आठवले

प्रतिनिधी, अकोला : विधान परिषदमध्ये भारतीय जनता पार्टीचा विजय झाला तर ठाकरे सरकारला कुठेही तोंड दाखवायला जागा राहणार नाही, भाजपचा विजय झाल्यास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी केली. अकोला महापालिकासह राज्यातील आगामी महापालिका निवडणूका रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट) हे लढणार अशी घोषणा आठवलेंनी केलीय. अकोल्यात एका विवाह संभारंभात आले होते या दरम्यांन ते बोलत होते. यासोबतचं नुपुर शर्मा आणि अग्निपथ या संदर्भातही प्रतिक्रिया दिली आहे.!