जनतेज न्युज

भाजपाने त्यांच्या राज्यात विज बिल माफ करून दाखवावी – संजय गायकवाड…

भाजपाने त्यांच्या कार्यकाळात एम.एस.ई.बी.चे 36 हजार कोटी रूपये थकीत ठेवले आहे. त्यामुळे एम.एस.ई.बी.चा कारभार डबघाईस आला आहे. हे त्यांच्या कार्यकाळातील पाप आहे. भाजपाने त्यांच्या कार्यकाळात शेतकऱ्यांना देशोधडीला लावले आहे. तेच भाजपाचे नेते आता शेतकऱ्यांना पुढे करून राजकारण करत आहे. आज राज्यभर विद्युत महामंडाच्या विरोधात आंदोलन करत आहे. विज बिल माफ करण्याची मागणी करत आहे. महाराष्ट्रात आघाडीची सरकार आहे. मुख्यमंत्री शिवसेनेचा आहे. शिवसेना व आघाडी शासनाला बदनाम करण्याकरीता संपुर्ण विज बिल माफ करण्याची मागणी करत आहे. खरच भाजपाला शेतकऱ्यांची चिंता असेल तर त्यांनी आधी त्यांच्या एकहाती सत्ता असलेल्या राज्यात सरसगट विज बिल माफ करून दाखवावे मग आम्हाला सांगावे. “आपले लपवुन ठेवायचे, अन्.. दुसऱ्याचे मात्र वाकुन बघायचे” ही दुटप्पी भुमिका भाजपाची आता जनतेने उळखली आहे. असा टोला सुध्दा आ. संजय गायकवाड यांनी यावेळी लगावला.