प्रतिनिधी , जळगाव : गेल्या आठवड्यात राज्यातील कोकणातील चिपळूण येथे पावसामुळे झालेल्या अतोनात नुकसान येथील नागरिकांचे झाले या संकटातून सावरण्यासाठी मदतीचा हात म्हणून चोपडा येथील शेतकरी कृती समिती व लोकसहभाग चळवळ च्या माध्यमातून 1 महिना पुरेल एवढा किराणा माल त्यात भाजीपाला कपडे औषधी अन्नधान्य असे जीवनावश्यक उपयोगी साहित्य जवळपास साडे सातलाख पर्यंतच्या किट घेऊन आज या गाडीची पूजा करून नारळ वाढवून रवाना करण्यात आली यावेळी घनश्याम आग्रवाल पोलीस निरीक्षक अवतारसिंग चव्हाण संदीप आराक नायब तहसीलदार राजेश पौळ श्रीकांत लोमटे डॉक्टर पंकज पाटील डॉक्टर गुरुप्रसाद वाघ रोटरी प्रेसिडेंट पंकज बोरोले शेतकरी कृती समितीचे एस बी पाटील लोकसहभाग चळवळीचे सदस्य व महिला उपस्थित होते.
