प्रतिनिधी , पंढरपूर : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कार्तिकी यात्रा रद्द करण्यात आलीय. पंढरपुरात 25 ते 26 अशी दोन दिवस संचाराबंदी लागू करण्यात आलीय. तर आता मंदिर समितीने देखील 25 ते 27 असे तीन दिवस विठ्ठल मंदिर बंद ठेवण्यात येणार आहे. कार्तिकी एकादशीला पहाटे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार सपत्नीक शासकीय महापूजा करणार आहेत. तर मानाचा वारकरी म्हणून आषाढी नंतर पुन्हा मंदिरातील विनाधार्याला मानाचा वारकरी म्हणून मान देण्यात येणार असल्याची माहिती समितीचे विठ्ठल जोशींनी दिलीय.
