प्रतिनिधी, औरंगाबाद : आदित्य ठाकरे यांच्या महालगाव येथे होणाऱ्या सभेमध्ये कोणतीही दगडफेक झाली नसल्याचे पोलीस अप्पर अधीक्षक सुनील लांजेवार यांनी सांगितले आहे. आदित्य ठाकरे यांचा ताफा पुढे गेल्यानंतर किरकोळ गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली होती. त्यामध्ये माध्यमाच्या प्रतिनिधीला किरकोळ दुखापत झाली होती. हा प्रकार वगळता कुठलाही अनुचित प्रकार घडलेला नसल्याचे पोलीस अप्पर अधीक्षक यांनी सांगितले. माननीय विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे जे पत्र दिलेले आहे ते पत्राच्या अनुषंगाने तसा काहीच प्रकार घडलेल्या नसल्याची पोलीस उपाधीक्षकांनी सांगितले. त्या क्लिप मध्ये कवनया गेल्यानंतर मिरवणुकीच्या पाठीमागे काहीतरी गोंधळ झाल्याची दिसते त्यामुळे माता रमाई यांच्या जयंतीनिमित्त मिरवणूक जात होती. त्यामुळे त्या ठिकाणी गर्दी दिसत आहे आणि अनुचित कोणत्याही प्रकार घडले नसल्याचे पोलीस अप्पर अधीक्षकांनी सांगितले.
