प्रतिनिधी, चंद्रपूर : सुप्रीम कोर्टात सुनावणीसाठी असलेल्या प्रकरणामुळे राज्यातील सरकार अस्थिर होईल, अशी कोणतीही शक्यता दिसत नाही. अशा कोणत्याही चुका झालेल्या नाही, ज्यामुळे सरकारचे अस्तित्व धोक्यात येईल. त्यामुळे या जर तरच्या गोष्टीत काही अर्थ नाही. हे सरकार स्थिर आणि मजबूत आहे, असे मत भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केले. विरुध्द निकाल लागण्यासाठी असा कोणताही मुद्दा सुप्रिम कोर्टात नाही की, ज्यातुन सरकार अस्थिर होऊ शकते. जनतेचं सरकार आहे.’सच परेशान हो सकता है, पराजित नहीं हो सकता’.
