जनतेज न्युज

वायदे बाजार बंद होण्याच्या मार्गावर; शेतकरी संघटना आक्रमक

प्रतिनिधी , अमरावती : केंद्र शासनाकडून शेतकऱ्यांसंदर्भातील अनेक निर्णय चुकीचे घेतले आहे. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. यामध्ये वायदे बाजार बंद करण्यात आल्याने शेतकऱ्यांवर मोठे संकट कोसळणार आहे. शेतपिकांचे नुकसान होऊन भाव मिळणार नाही. त्यामुळे बंद करण्यात आलेला वायदे बाजार पुन्हा सुरू करण्यात यावा, या मागणीला घेऊन शेतकरी संघटनेच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांमार्फत पंतप्रधानांना निवेदन देण्यात आले. यावेळी तीव्र नारेबाजी शेतकरी संघटनेकडून करण्यात आली.