जनतेज न्युज

विजेच्या लपंडावाने शेतकरी संकटात; पीक करपू लागली

प्रतिनिधी, बीड :  बीड जिल्ह्यात खरीप हंगामात अतिवृष्टीने मोठ्या प्रमाणात पिकांचे नुकसान झाले होते. त्यामुळे शेतकऱ्यांची मदार रब्बी हंगामावर अवलंबून होती. मात्र रब्बी हंगामात शेतकऱ्यांना पिकाला पाणी देण्यासाठी वीज उपलब्ध नसल्याने शेतकरी अडचणीत सापडले आहेत.जिल्ह्यात अनेक ठिकाणी विद्युत रोहित्र बंद असल्याने शेतकऱ्यांना पिकासाठी पाणी उपलब्ध नाही. परिणामी पीक करपून जात आहे. या परिस्थितीत राज्य सरकारने शेतकऱ्यांना आधार द्यावा, अशी मागणी शेतकरी करीत आहेत. नामलगाव शिवारात विद्युत रोहित्राने अचानक पेट घेतल्याने परिसरातील वीज पुरवठा बंद आहे. त्यामुळे पीक सुकून जात आहे.