जनतेज न्युज

वीज पुरवठा सुरळीत करण्यासाठी करमाळा तहसिल कार्यालयासमोर धरणे आंदोलन

प्रतिनिधी, सोलापूर : करमाळा तालुक्यातील शेतीपंपाचा वीज पुरवठा हा सक्तीची वीज बिल वसूली नावाखाली सध्या खंडीत झाला असून यामुळे शेतकरी त्रस्त झाले आहेत. यावर शेतकऱ्याची बाजू मांडण्यासाठी माजी आमदार नारायण पाटील यांच्या नेतृत्वाखाली करमाळा तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. यावेळी बोलताना माजी आमदार पाटील म्हणाले की, शेतकरी हा जगाचा पोशिंदा असून वीज बिल वसुलीपायी त्याच्या उभ्या पिकांचे नुकसान करणे म्हणजे राज्याचे वा देशाचे नुकसान करण्यासारखे आहे. त्यांच्या इमानदारीवर विश्वास ठेवून महावितरणने सबूरीने वसुली करावी. वरीष्ठ पातळीवर घेतले गेलेले धोरणात्मक निर्णय आणि प्रत्यक्ष शेतकऱ्याच्या बांधावरचे वास्तव यात जमीन आसमानचा फरक असून तालुक्यातील काम करणाऱ्या महावितरणच्या अधिकार्‍यांनी वरीष्ठ पातळीवर सत्य परिस्थितीचा अहवाल पाठवला पाहिजे.थ्री फेजसह सिंगलफेज वीज पुरवठा सुध्दा बंद करुन महावितरण आता आमच्या सहनशीलतेचा अंत पाहणार आहे काय असा सवाल करत जर तातडीने सर्व वीजपुरवठा सुरु करुन आठ तास सलग वीज नाही दिली तर आणखी तीव्र आंदोलन केले जाईल असा इशाराही पाटील यांनी दिला.

       यावेळी बोलताना माजी आमदार पाटील म्हणाले की, शेतकरी हा जगाचा पोशिंदा असून वीज बिल वसुलीपायी त्याच्या उभ्या पिकांचे नुकसान करणे म्हणजे राज्याचे वा देशाचे नुकसान करण्यासारखे आहे. त्यांच्या इमानदारीवर विश्वास ठेवून महावितरणने सबूरीने वसुली करावी. वरीष्ठ पातळीवर घेतले गेलेले धोरणात्मक निर्णय आणि प्रत्यक्ष शेतकऱ्याच्या बांधावरचे वास्तव यात जमीन आसमानचा फरक असून तालुक्यातील काम करणाऱ्या महावितरणच्या अधिकार्‍यांनी वरीष्ठ पातळीवर सत्य परिस्थितीचा अहवाल पाठवला पाहिजे.प्रास्तविक पाटील गटाचे प्रवक्ते सुनील तळेकर यांनी केले. यावेळी तहसीलदार समीर माने, पोलीस निरीक्षक सूर्यकांत पाटील व महावितरणचे जेऊर तसेच करमाळा विभागाचे अधिकारी आंदोलनस्थळी आले व त्यांनी निवेदन स्विकारले. यानंतर तहसीलदार यांच्या दालनात पोलीस  निरिक्षक व महावितरण अधिकारी यांचे सोबत माजी आमदार नारायण पाटील आणि त्यांच्या समवेत असलेल्या शिष्टमंडळ यांनी चर्चा केली. महावितरणच्या वरीष्ठ अधिकाऱ्यांना भ्रमणध्वनी वरुन थेट संभाषण करुन यावर परत उद्या आणखी एक बैठक घेण्यात येणार असल्याचे नक्की झाले.तो पर्यंत तातडीने सिंगल फेज वीज सुरु करुन थ्री फेज वीज पुरवठा दोन तास देण्याची हमी महावितरणकडून देण्यात आली व लगेच कार्यवाही झाली. उद्या वसुलीच्या रकमेबाबत व सवलतीबाबत तोडगा निघणार आहे. या आंदोलनात हजारो शेतकरी सहभागी झाले होते.यावेळी जि प सदस्या सवितादेवी राजेभोसले, नवनाथ झोळ व बिभीषण आवटे, सभापती अतुल पाटील, सदस्य दत्ता सरडे,नागनाथ लकडे, बिले सर, पृथ्वीराज पाटील, महेश चिवटे, महेंद्र पाटील, डाॅ अमोल घाडगे, दराडे गूरुजी, धुळाभाऊ कोकरे, रमेश कांबळे, संतोष जाधव-पाटील, दत्ता गव्हाणे, गणेश चौधरी, रणसिंग बापू, रामेश्वर तळेकर, हनूमंत सरडे यासह अनेक आजी माजी पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी भाजपाच्या वतीने राज्य सचिव दिपक चव्हाण, तालुका सरचिटणीस अमरजीत साळूंखे, शहर प्रमुख जगदिश अगरवाल, आदेश कांबळे, नरेंद्रसिंह ठाकूर यांनी पाठींबा दिला तसेच बळीराजा संघटनेच्या वतीने अण्णा सुपनवर यांनीही पाठिंबा दिला. पोलीस निरीक्षक सूर्यकांत कोकणे यांच्या नेतृत्वाखाली चोख बंदोबस्त ठेवण्यात आल्याने कोणताही अनुचित प्रकार घडला नाही.